ब्रिजटाउन: टी-२० मध्ये अनेक लढती या अखेरच्या षटकापर्यंत रंगतात. अशीच एक थरारक लढत चाहत्यांना नुकतीच पाहायला मिळाली. वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका सुरू आहे. यातील दुसऱ्या लढतीत एक तुफान लढत झाली. वाचा- वेस्ट इंडिजला अखेरच्या षटकात विजयासाठी ३० धावांची गरज होती. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजला १७२ धावांचे आव्हान दिले होते. वेस्ट इंडिजच्या संघाने अखेरच्या चेंडूपर्यंत लढत दिली. त्यांना विजयासाठी ३० धावा हव्या असताना फलंदाजांनी दोन चौकार, ३ षटकार मारले तर २ वाइड चेंडूसह २८ धावा केल्या. जर वेस्ट इंडिजने २९ धावा केल्या असत्या तर सामना टाय झाला असता. वेस्ट इंडिजला एक धाव काढण्यास अपयशी ठरल्याने इंग्लंडने लढत जिंकली आणि मालिकेत १-१ अशी बरोबरी केली. इंग्लंड संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकतीच एशेस मालिका ४-० अशी गमावली होती. त्यानंतर पहिल्या वनडेत वेस्ट इंडिजने त्याचा ९ विकेटनी पराभव केला. वाचा- वाचा- दुसऱ्या टी-२० मध्ये वेस्ट इंडिजने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. इंग्लंडने ८ बाद १७१ धावा केल्या. जेसन रॉयने ३१ चेंडूत ४५ धावा केल्या. उत्तरादाखल वेस्ट इंडिजने धावांचा पाठलाग करताना १३ षटकात ७ बाद ७८ धावा केल्या होत्या. एक वेळ अशी होती की वेस्ट इंडिजने ८ बाद १११ धावा केल्या होत्या. त्यांना अखेरच्या ३ षटकात ६० धावांची गरज होती. वेस्ट इंडिजच्या दहाव्या क्रमांकाचा फलंदाज अकील हुसैनने साकिब महमूदच्या अखेरच्या षटकात ३ चेंडूवर ३ षटकार मारले. त्याने १६ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांसह ४४ धावा केल्या. तर रोमारियो शेफर्ड २८ चेंडूत १ चौकार आणि ५ षटकारांसह ४४ धावा केल्या.
You are receiving this email because you subscribed to this feed at blogtrottr.com.